तलाठी भारती होणार १५ दिवसांत सुरु २०२३ | काय असतील नियम बघा लवकर
omyablog | Talathi Bharti
राज्यातील तलाठी (Talathi) भरती बाबत आपले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात १५ मार्च पासून भरती प्रक्रिया चालू होईल अस ते अहमदनगर मधील लोणी या महसूल परिषदेत म्हणाले होते. पण अद्याप हि सुरुवात झाली नाही.
पण आता हि भरती ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. हि भरती मार्च मध्येच जाहिरात येईल अशी शक्यता आहे . त्यामुळ विद्यार्थ्यांनी आता पासूनच तयारीला लागायला पाहिजे.
शैक्षणिक पात्रता काय असेल ?
1) या तलाठी भरती (Talathi) साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संबंधित पदानुसार बारावी आणि Graduation
शिक्षण असण आवशयक असेल .
2) उमेदवारांना मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण पाहिजे.
3) उमेदवारांना मराठी, हिंदी , इंग्रजी , विषयाचे ज्ञान असणे .
अर्ज कसा करायचा ?
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जदाराचे स्वतःचे Gmail अकाऊंट असावे
अर्जदाराचा साईट वर प्रोफाईल बनवून त्या मध्ये योग्य ती माहिती भरल्या नंतर submit या बटनावर क्लिक करा,
काय असतील कागदपत्र ?
- दहावी ,बारावी, आणि पदवी शिक्षणाची प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय असाल तर )
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सही
- नॉन क्रीमिलियर (obc)
Tags:
talathi